रत्नागिरी : शहरातील मुख्य मार्गावर बुजवलेले खड्यांतील डबर आणि खडी पुन्हा वर आल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मारुती मंदिरपासून पुढे आरोग्य मंदिर ते शिवाजीनगर या भागात मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच खड्डयांतील खडीही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या खड्यांमध्ये वाहने जाऊन वाहनांमध्ये बिघाड होण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुचाकीसह अन्य वाहनचालक संतप्त होत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:51 PM 05-Oct-21