कोरोना व्हायरसचे नाव घेताच सर्वांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होत असतानाच रत्नागिरीतील एका बंदरात चीन वरून आलेल्या जहाजाने आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. या जहाजावर २३ कर्मचारी असून या सर्वांची तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे मालवाहू जहाज १७ रोजी चीनवरून निघून इंडोनेशिया-सिंगापूर करून हे जहाज रत्नागिरीत दाखल झाले आहे मात्र सबंधित कंपनीने हे जहाज इंडोनेशियावरून आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र याबाबत अजूनही संभ्रम आहे.