पुणे : आज सकाळपासूनच पवारांशी संबंधित असलेल्या विविध कारखाने आणि त्या कारखान्यांच्या संचालकांच्या प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे पवारांच्या अडचणी यामुळे वाढणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याचाही समावेश आहे. प्राप्तिकर विभागाची कारवाई झाल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे की, अजित पवार काहीही लपवत नाहीत, हा तर भाजपचा बदनाम करण्याचा हेतू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली. त्यानंतर लगेच आज त्या कारखान्यावर कारवाई कऱण्यात आली. त्यामुळे भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून घेत असल्याचा आरोपही जयंत पाटलांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना केला आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटलांनी म्हटलं की, ‘अजित पवारांनी कोणतीही कागदपत्रे दडवली नाहीत, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्र जाहीर करण्याचा संबंधच येत नाही. तसेच ते कधीही काहीही लपवत नाहीत’, असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 07-Oct-21