अटी आणि शर्थीवर जलतरण तलाव सुरु होणार

0

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील सुमारे दोन वर्षापासून बंद असणारा जलतरण तलाव आता अटी आणि शर्थीवर सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जरी केल्या आहेत. १८ वर्षावरील खेळाडू आणि व्यवस्थापन कर्मचारीवृंद यांच्या लसीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच १८ वर्षाखालील वयोगटातील मुलांचे लसीकरण न झाल्याने पालकांचे संमत्तीपत्र, वयाचा पुरावा, आधारकार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र सोबत असणे आवश्यक असणार आहे. या सर्व अटींचे पालन करून जिल्हाधिकारी यांनी जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मागील दोन वर्षापासून बंद असणारे जलतरण तलाव आता या नव्या आदेशामुळे सुरु होण्याची चिन्ह आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:14 PM 08/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here