राज्यात 72 हजार पदांच्या महाभरतीला सुरूवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याची माहिती आहे. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मुर्त स्वरूप दिलं आहे. गृह, पाणी पुरवठा, शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, आरोग्य यासह अन्य विभागांकडून रिक्त माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये पावणे दोन लाख रिक्त पदं आहेत.