जेव्हा मनसेचा जन्म देखील झाला नव्हता, तेव्हापासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, ही शिवसेनेची जुनी मागणी असल्याचे वक्तव्य परिवहनमंत्री अनिल परब यांनी करत मनसेवर निशाणा साधला. याबाबत लवकरच सरकार निर्णय घेईल. एका दिवसात सर्वच निर्णय घेता येणार नसल्याचेही परब म्हणाले.
