काजू तारण माल योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 188 मेट्रीक टन काजू बी तारण

0

रत्नागिरी : जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने काजू तारण माल योजनेंतर्गत यंदा 188.01 मेट्रीक टन काजू बी तारणात ठेवली होती. त्यापोटी 1 कोटी 51 लाख 69 हजार 536 एवढे कर्ज वितरीत करण्यात आले होते. जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रात प्रामुख्याने आंबा व काजू-बी ही दोन पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या ठीकाणी काजू-बीचे जास्त प्रमाणात पिक येतात. त्याप्रमाणे संगमेश्वर, लांजा या ठिकाणीही काजू-बीचे पिकवरील तालुक्यापेक्षा अल्प प्रमाणात येत असते. गतवर्षी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविली होती. बाजार समितीच्या नाचणे येथील मुख्य कार्यालयाजवळील गोदामात काजू-बी ठेऊन ही योजनेला सुरवात झाली. इतर तालुक्यातही विकास संस्थांच्या गोदामाचा वापर करण्यात आला. यावर्षी बहुतांश स्वतः काजू बी उत्पादक शेतक-यांनी स्वतःची गोदामे उपलब्ध करुन बाजार समितीला दिल्यामुळे व्याप्ती वाढली. ही योजना काजू-बी शेतक-याला शेतीमालाचे बाजारमुल्याच्या 75 टक्के प्रमाणे कर्ज अग्रिम म्हणून 6 टक्के व्याज दराने 6 महिन्याकरीता (180 दिवस) दिले जाते. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोरोना महामारी सारख्या रोगाचा फलाव असूनही या सर्व परिस्थितीचा विचार करुन 2020-2021 या हंगामात समितीने मागील वर्षाच्या तुलनेत समितीमार्फत विक्रमी शेतमाल तारण योजना कर्ज वितरण केले आहे. या कालावधीत समितीने एकुण 23 शेतक-यांकडून कडून 188.01 मेट्रीक टन काजूबी तारणात ठेऊन एक कोटी एकावन्न लाख एकुणसत्तर हजार पाचशे तीस मात्र इतक्या रक्कमेचे कर्ज वितरीत केले. त्यामुळे समितीचे दिड कोटीचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण झाले. ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी समितीचे सभापती संजय आयरे यांच्यासह प्रभारी सचिव प्रमोद मोहीते आणि अन्य सर्व संचालकांनी आपापल्या भागामधील शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:40 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here