“राजनाथ सिंह जिंकून आलेत; पंतप्रधानांना फोन करुन मागच्या दाराने मुख्यमंत्री झाले नाही”

0

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. सध्या केंद्र सरकारकडून छापा काट्याचा खेळ सुरू आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांवर मोजक्या शब्दांत भाष्य केलं. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याची भाषा केली जात आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं. दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या वादावरुन देखील निशाणा साधला. राजनाथ सिंह यांना काही दिवसांपूर्वी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता. पण, सावरकर आणि महात्मा गांधी यांची नाव घेण्याची तरी आपली लायकी आहे का? असा विखारी सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानवरुन भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. भातखळकर ट्विटद्वारे म्हणाले की, सोनिया मतोश्रींचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी हा किती मोठा विनोद. अहो ते जिंकून आलेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने CM थोडेच झालेत, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here