अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. कांचनगिरी यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माँ कांचनगिरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “हिंदू राष्ट्राबाबत राज ठाकरे यांच्याशी आज चर्चा झाली. त्यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे. हिंदू राष्ट्राच्या मजबूतीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांना आम्ही केलं”, असं कांचनगिरी म्हणाल्या.
उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत गुरू माँ कांचनगिरी यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राज यांच्यासोबत उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं. “राज ठाकरे यांच्या मनात जे उत्तर भारतीयांबाबत होतं त्याबाबत मी त्यांच्याशी बोलले. पण त्याच्या मनात उत्तर भारतीयांबाबत अजिबात द्वेषभावना नाही हे मला त्यांच्यासोबतच्या चर्चेत जाणवलं. उत्तर भारतीयांवर राज ठाकरेंचं प्रेम आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातून मुंबई आलेल्यांनी निश्चिंत राहावं कारण राज ठाकरे यांचं उत्तर भारतीयांवरील प्रेम त्यांच्यासोबतच्या चर्चेत मला जाणवलं”, असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या.
राज ठाकरे यांनी भाजपासोबत जावं का? असं विचारण्यात आलं असता कांचनगिरी यांनी महत्त्वाचं विधान केलं. “मी हिंदूराष्ट्रासाठी काम करत आले आहे आणि यापुढेही करत राहिन. राजकाराणाबाबत मला माहित नाही. मी साध्वी आहे. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं. कारण देशात सध्या नवं हिंदुत्व जन्माला येतंय आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडेल. त्यामुळे सर्व हिंदुंनी एकत्र यायला हवं”, असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:14 PM 18-Oct-21