कोजागरी पौर्णिमा धन-धान्य, सुख-शांती, आरोग्य व समृद्धी घेऊन येवो : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई : निसर्ग आणि कृषी संस्कृतीशी नातं सांगणारी कोजागरी पौर्णिमा राज्यातील प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, भारतीय संस्कृतीत कोजागरी पौर्णिमेचे आध्यात्मिक, कृषीसमृद्धीच्या दृष्टीने असाधारण महत्त्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा, नाविन्याचे स्वागत करण्याचा हा सण आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा हा सण कोकणात भात, नाचणी, वरीसारख्या धान्याचे पूजन करुन नवान्न पौर्णिमा म्हणून साजरा होतो. कोजागरी पोर्णिमा साजरी करण्याच्या प्रथा-पद्धती हे आपले सांस्कृतिक वैभव असून ते टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करुया. राज्यावरचे कोरोनाचं संकट कमी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन, यंदाची ‘कोजागरी’ ही सर्वांनी प्रतिबंधक नियमांचे पालन करुन, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आनंदात साजरी करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here