रत्नागिरी : भारत सरकारच्या सरकारी बँक खासगीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेच्या आंदोलनाचा एक भाग ग्राहक व सामान्य नागरिक यांच्या पंतप्रधानांना द्यावयाच्या निवेदनावर स्वाक्षरी मोहिमेला रत्नागिरी व चिपळूणमध्ये मुख्य बाजारपेठ येथे शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी बाजारपेठेमध्ये सावरकर चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेच्या प्रांगणात मंडप टाकून आम जनतेच्या निवेदनावर स्वाक्षरी घेण्यात आल्या. चिपळूण मुख्य बाजारपेठ मधील गजबजलेल्या जुना एस.टी. स्टॅण्ड येथील बँक ऑफ इंडियाच्या समोरील मोकळ्या जागेत टेबल-खुर्ची टाकून तेथील जनतेच्या निवेदनावर स्वाक्षरी घेण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे सरकारवर टीका करत सह्या केल्या. दोन्ही ठिकाणच्या मिळून १ हजार नागरिकांनी, स्वाक्षरी मोहिमेत सहभाग दर्शविला. रत्नागिरीत मध्ये बँक ऑफ इंडियाचे कॉ. विनोद कदम (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), विनोद आठवले (उपाध्यक्ष), मनोज लिंगायत, मनोहर रहाटे, प्रथमेश किनरे, कल्पेश लोहार, कडमडकर, प्रकाश झगडे, गंगावणे, वाडेकर, आडिवरेकर, शिवप्रसाद लिंगायत इत्यादी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 20-Oct-21