रत्नागिरी : गावामध्ये विकासात्मक कामे करीत असताना एकमेकांमधील मतभेद दूर ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्ण हॉल लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ना. सामंत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचेदेखील लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, जि.प. सदस्य बाबू म्हाप, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी मान्यवरांसह जाकादेवी येथील नागरिक उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:00 PM 20-Oct-21