समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार, नवाब मलिकांचं जाहीर आव्हान

0

मुंबई : एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार असल्याचं जाहीर आव्हान अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी दिलं आहे. पुण्याच्या मावळमध्ये अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. समीर वानखेडे यांनी कुणाच्या सांगण्यावरुन कारवाई केली? असा सवालही उपस्थित केलाय. पुण्यातील सभेत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ‘समीर वानखेडेंना आव्हान देतो. वर्षभरात नोकरी जाईल. तुरुंगवास निश्चित आहे. राज्याची जनता सध्या सुरु असलेलं सर्व पाहत आहे. समीर वानखेडेंची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करुन यात माझं काही नाही, असं म्हणाले. मग कुणाच्या सांगण्यावरुन कारवाई केली? उत्तर द्या. मी कुणालाही घाबरत नाही. समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही.’
समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी मीडिया घेऊन का गेले? चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. यात वानखेडे भाजप वाल्यांचा म्होरक्या आहे. बोगसगिरी करतोय, त्यामुळेच या बोगस केसेस आहेत. हे कोर्टात टिकणार नाहीत. येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समजलंय. ही तोडपाणी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:22 PM 21-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here