मुंबई : भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच अनिल परब यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत गुंतलेत की, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?, मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का?” असा सवाल देखील उपाध्ये यांनी केला आहे. यासोबतच “महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) च्या 306 कर्मचाऱ्यांचा कोविडमध्ये मृत्यू, 25 कर्मचाऱ्यांची आत्महत्या पण ठाकरे सरकार मात्र थंड आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. तसेच “शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय” अशा शब्दांत टोला लगावला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:40 PM 23-Oct-21
