मुंबई : सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती. ते नागपुरातील अत्याधुनिक डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी बोलत होते. तसेच, केंद्रातील तपास युनिटच या प्रकरणांचा तपास लावू शकतात, असे नाही. तर, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले होते पण त्यात ‘हिरोईन’चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावरुन भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, जेव्हा मंत्री पत्रकार परिषद घेऊन ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, तेव्हा मुख्यमंत्री मागे कसे राहतील? महाराष्ट्राला हेही दिवस पहायचे होते, अशी टीका करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 23-Oct-21