रत्नागिरी : पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे मोफत विधी सेवा कोणाला व कुठे मिळू शकते, (ग्रामपंचायत/पोस्ट ऑफिस) आरोपींचे अधिकार (पोलिस ठाणे) याबाबतचे माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे दि. २३/१०/२०२१ रोजी १०.५५ वाजता जिल्हयातील एकुण ६६ ठिकाणी सदर माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या माहितीपर फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश आनंद सामंत यांनी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, पोलिस ठाणे याठिकाणी विधी सेवा प्राधिकरणतर्फे माहित फलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली. रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय रत्नागिरी नगरपरिषद, नाचणे ग्रामपंचायत, खेडशी ग्रामपंचायत, कुवारबांव ग्रामपंचायत, हातखंबा ग्रामपंचायत, रत्नागिरी शहर पोलिस ठाणे, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे, रत्नागिरी पोस्ट ऑफिस, टिळक मेमोरियल पोस्ट ऑफिस, नाचणे पोस्ट ऑफिस आणि शिवाजीनगर पोस्ट ऑफिस येथे नवीन नियुक्त अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १ श्रीमती एस.एच. पाटील, श्रीमती आर. बी.यादव, एम. डी. महाडीक, श्रीमती एल.पी. रॉड्रीग्ज, के. ए. यादव, एम. आर. काळे, श्रीमती एम. एम. पाटील, एम. ए. शिंदे, पी. आर. भोसले, एस. एस. नलावडे आणि श्रीमती टी. आर. गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लांजा, राजापूर, दापोली, चिपळूण, खेड, गुहागर आणि देवरूख येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत आणि पोलिस ठाणे अशा एकूण ५३ ठिकाणी माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 23-Oct-21
