गुहागर : मला खिंडीतपकडणे एवढे सोपे काम नाही. जे पकडतील तेच अडकून पडतील आणि ते या खिंडीत येणार आहेत का ते पहावे, हे कोणीही माझ्या नादाला लागणार नाहीत, असे सूचक वक्तव्य करतानाच माझा मतदारसंघ सुरक्षित आहे. जोडीला विकासाची कामे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता खंबीर आहे. प्रत्येक गटातील माझे कार्यकर्तेच मेहनत घेतील व मला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, असा आत्मविश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
गुहागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते. ते म्हणाले, मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवसापासून माझा प्रचार सुरू झाला आहे व तेथील गर्दी पाहता माझ्या विजयाची पावती आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यांचाही फायदा मला होणार आहे. आमदारकीच्या काळात मी विरोधकांना कधीच त्रास दिला नाही. युतीत असताना चिपळूणातदेखील मला भाजपने मदत केली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांचे अजूनही मित्र आहोत, त्यामुळे भाजपचे लोकही मला मतदान करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 05/Nov/2024














