मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्री पदाचा मान कोणाला मिळणार यावरुन स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊतांनीही यावरुन टोला लगावला आहे.
शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या दिवशी आपल्या गावी – राऊत
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 8 दिवस झाले. अजून किती दिवस एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार? असा सवाल राऊतांनी केला. एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या दिवशी आपल्या गावाला निघून गेले, त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? असं संजय राऊत म्हणाले.
आज वर्षातील शेवटची शनि अमावस्या
आज शनि अमावस्येचा दिवस आहे, हा दिवस आपल्यावर येणाऱ्या अडचणी आणि संकटं दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो. या दिवशी काही खास उपाय करुन देवीदेवतांना प्रसन्न केलं जातं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 30-11-2024














