मंडणगड : किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्यास शेतकरी लाभार्थ्यांचे आंदोलन

मंडणगड : भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा मंडणगडमधील विविध गावांतील शेतकऱ्यांना सात-बारामधील महसुली तांत्रिक समस्येमुळे गेली दोन वर्षे लाभ मिळत नाही. त्याअनुषंगाने या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) मंडणगड शाखेच्यावतीने तहसीलदार अक्षय ढाकणे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

२६ जानेवारीपर्यंत शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळून निधी मिळाला नाही, तर प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती रिपाइंचे विजय खैरे यांनी दिली. या योजनेपासून वंचित असलेल्या तालुक्यातील लाभार्थ्यांनी वेळोवेळी तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. योग्य कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 18/Jan/2025