धामणंद येथील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

खेड : तालुक्यातील घाणेखुंट-गवळवाडी येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामावर पाणी मारत असताना मोटर पंपच्या विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गणेश हरिचंद्र उतेकर (४० रा. धामणंद-पायरवाडी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने ऐन शिमगोत्सवात उतेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गणेश हा तरुण घाणेखुंट येथे सुरू असलेल्या नवीन इमारत बांधकामावर पाणी मारण्याचे काम करत होता. या कामासाठी पाण्याची मोटर चालू केली. मोटरच्या तारेचा स्पर्श झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. ही बाब सहकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर लोटे पोलीस दूरक्षेत्रास पोलिसांनी कळवण्यात घटनास्थळी आले. पंचनामा केला. याप्रकरणी सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 18-03-2025