मुंबई : कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. रायगडच्या पायथ्याशी रखरखत्या उनामुळे त्यांना त्रास झाला असून त्यांचा बीपी वाढलेला असून शुगर लेवल खूप कमी झाली असल्याची माहिती मिळत आहे.
भर उन्हात अन्नत्याग सुरू असल्यामुळे अधिकच त्रास होत असल्याने बच्चू कडू यांना हा त्रास झाल्याचे सांगण्यात आले आहे.
दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. प्रहार नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
लाडकी बहीण नाममात्र असून, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. असा आरोपही त्यांनी या आंदोलनात केला होता.
रायगडमध्ये 21मार्चला हे रक्तदान शिबिर आणि अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले होते.
मात्र, उन्हामुळे भर उन्हात अन्नत्याग सुरू असल्यामुळे अधिकच त्रास होत असल्याने बच्चू कडू यांना हा त्रास झाल्याची माहिती मिळत आहे.
अन्नत्याग आंदोलनात प्रहार पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 22-03-2025














