Pahalgam Terror Attack: पहलगाम दुर्घटनेलाही नेहरु जबाबदार का? मोदी पंतप्रधान झाल्यापासून हल्ल्यात लाखो मृत्युमुखी; गायिकेचे टीकास्त्र

मुंबई- मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येते दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले. या भयंकर घटनेचे व्हिडिओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिक व राजकीय लोक, सेलिब्रिटी यांच्या संतप्त प्रतिक्रिया यावर येत आहेत. यापूर्वीही दहशतवाद्यांकडून बरेचदा भारतात घुसखोरी झालेली आणि त्यांनी निष्पापांना जिवे मारले होते. यावेळची घटना अत्यंत हृदयद्रावक होती. तेथील पर्यटकांना तुम्ही हिंदू आहात का असे विचारून त्यांना गोळ्यांनी मारले जात होते. त्यामुळे नागरिक भारताच्या सरकारकडे याचा बदला घेण्याची मागणी करत आहे.

नेहाने व्हिडिओमध्ये म्हटले की, काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. नोटाबंदी करून तुम्ही दहशतवाद्यांचे कंबर मोडली होती मग हे कसे घडले? किती काळ देश वकृत्वावर चालणार? की या हल्ल्यालाही आता नेहरूजी जबाबदार आहेत? कोणताही पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारणार नाही तुम्ही कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही. संपूर्ण देशाला हे आधीच माहिती आहे पण मी तुम्हाला प्रश्न विचारेन…

या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बऱ्याच सेलिब्रिटींनी सुद्धा त्यांचा राग सोशल मीडिया मार्फत व्यक्त केला. गायिका नेहा सिंह राठोड तिने सुद्धा या हल्ल्या साठी मोदी सरकारवर टीका केली. तिने आपल्या एक्स अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात काही प्रश्न उपस्थित करून मोदी सरकारवर टीका केली आहे.

तुमच्या 56 इंच छातीचा आणि लाल डोळ्यांचा काय उपयोग? सर्जिकल स्ट्राइक खरोखरच एक कथा होती का? कलम ३७० वर मोठ्या गप्पा मारून काय उपयोग? पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले, पहलगाम हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला…. मोदीजी मला सांगा काश्मीरचे स्वातंत्र्य दहशतवाद्यांच्या दयेवर अवलंबून आहे का? मोदी जी कृपया उत्तर द्या. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मते मिळवण्याचे आणि देशावासीयांचे मृतदेह गोळा करण्याचे काम किती काळ सुरू राहणार?

तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून देशात लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कधी ऑक्सिजन कमी पडला म्हणून तर कधी वॅक्सिनमुळे… कधी रेल्वे दुर्घटने तर कधी पूल पडल्यामुळे. पण तुम्ही कधीही कोणतीही जबाबदारी घेतली नाही. देशावासीयांच्या मृत्यूची जबाबदारी तुम्ही घेणार? तुमच्या चुका तुम्ही कधी मान्य करणार? उत्तर द्या मोदीजी… तुमच्या चुकांसाठी देशवासीयांनी त्यांच्या प्राण्यांचे बलिदान द्यायचे का? मोदीजी किती काय शांत राहणार? असं तिने म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 23-04-2025