देवळे परिसरात गव्यांचा धुमाकूळ

संगमेश्वर : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील देवळे, जंगलवाडी, चाफवली, मेघी या गावांसह परिसरात काही दिवस मोठ्या प्रमाणात गव्यांचे कळप शेती, बागायतीमध्ये घुसून शेतीचे नुकसान करीत आहेत.

दहा ते बारा गव्यांचा कळप असून, तो गेले दोन-तीन महिने या परिसरात वावरत आहे. गव्यांचा हा कळप बागांमध्ये शिरून आंबा, काजूची झाडे मोडत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 30/May/2025