रत्नागिरी : मोदी सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रगतिपथावर अनेक माईलस्टोन्स रचले. हा यशस्वी प्रवास घराघरात पोहोचावा, म्हणून महाराष्ट्र भाजपा परिवाराने मोदी सरकारची आदर्श धोरणे आणि त्यांना मिळालेले यश जनतेसमोर मांडण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
या उपक्रमांतर्गत आज भाजपा रत्नागिरी जिल्हा पक्ष कार्यालय येथे आयोजित ‘मोदी सरकारच्या ११ वर्षांतील यशस्वी योजनांचे प्रदर्शन’ या विशेष कार्यक्रमाचे रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 19-06-2025














