राजापूर : हातीवलेत वीज पडून पाच कामगार जखमी

राजापूर : तालुक्यातील हातीवले-आरेकरवाडी परिसरामध्ये वीज पडल्याची घटना घडली. यामध्ये येथील चिरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाले आहेत. सर्व जखमी कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

मागील काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामध्ये गत आठवड्यात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान झाले आहे. अशातच आज सायंकाळीदेखील ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यामध्ये हातीवले-आरेकरवाडी परिसरात वीज पडल्याची घटना सायंकाळी उशिरा घडली. त्या परिसरातील चिरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाले. त्यांना तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी येथील राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुक्यात परतीचा पाऊस सुरू असताना गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वीज पडून नुकसान झाल्याची घटना घडल्याने नागरिकांत काहीसे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 19-10-2024