Ratnagiri : जिल्ह्यात फळे-फुलांच्या दरात ५० टक्के वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात लाडक्या गणरायाचे आगमन जल्लोषात झाले असून, बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. पूजेसाठी फुले, फळे आणि इतर साहित्याच्या दरात तब्बल ५० टक्यांनी वाढ झाली आहे.गौरी-गणपती उत्सवानिमित्त फुलांचा आणि फळांचा बाजार चांगलाच बहरला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका फुलशेतीला बसला आहे. विशेषतः झेंडू, शेवंती, निशिगंध या फुलांचे मोठे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. याचा थेट परिणाम दरांवर झाला असून, फुलांच्या किमतीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

फुलांप्रमाणेच फळांचे दरही वाढले आहेत. सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब आणि गोड लिंबू या फळांचेही दर वाढले आहेत. पूजेसाठी लागणारे नारळ, सुपारी, आंब्याची डहाळी यांच्या दरातही वाढ दिसून येत आहे. दर वाढले असले तरी, लाडक्या बाप्पाच्या सेवेत कोणतीही कसर राहू नये यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम झालेला नाही.

पूजेसाठी लागणारे वस्तूंच्या किंमती
शेवंतीची फुले- १५० रूपये किलो दुर्वांची जुडी २० ते ३० रूपये, झेंडू १५० रूपये किलो निशिगंधा-५०० रूपये किलो गुलाब १५० रूपये ते ३०० रूपये शेकडा जास्वंद-१५ ते २० रूपये नग फूलवाती १२० रूपये कापसी वस्त्र- १० रूपये नग साधा कापूर-९०० रूपये किलो, भीमसेन कापूर- १००० अष्टगंधाची बाटली-५० रूपये साधे कुंकु हळदीचे कुंकु ६०० रूपये किलो शेंदूर- ६०० रूपये किलो गुलाब जल- १० रूपये मध, अत्तर-२० रूपये धूप २० ते १२० रूपये अगरबत्ती- ८० ते १०० २५० रूपये किलो, हळदीचे कुंकु ६०० रूपये किलो शेंदूर- ६०० रूपये किलो गुलाब जल- १० रूपये मध, अत्तर-२० रूपये धूप २० ते १२० रूपये अगरबत्ती- ८० ते १००

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 AM 29-Aug-2025