राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार, शिवसेनेचे नेते किरण सामंत, महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ. राजन साळवी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, यशवंत हर्याण असे चौघांनी आज गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातून, राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आजपासून खर्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी या सार्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले.














