IND vs SA 2nd ODI : भारत दुसऱ्या सामन्यात 358 धावा करूनही पराभव;केएल राहुलने सांगितली सर्वात महत्वाची गोष्ट..

रायपूर : भारताने दुसऱ्या सामन्यात ३५८ धावांचा डोंगर उभारला, पण त्यानंतरही भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली. भारताला ३५८ धावा करुनही का पराभव पत्करावा लागला, याचे कारण आता कर्णधार केएल राहुलने सांगितले आहे.

भारताने गेल्या सामन्यात ३४९ धावा केल्या होत्या, पण तरीही भारताला विजय मिळवता आला होता. पण या सामन्यात तर भारताने त्यापेक्षा जास्त धावा केल्या, त्यामुळे भारताला विजय मिळवणे आधीपेक्षा जास्त सोपे असल्याचे चाहत्यांना वाटत होते. पण या सामन्यात जास्त धावा करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. भारताला या सामन्यात का पराभव पत्करावा लागला, याचे कारण आता केएल राहुलने सामना संपल्यावर सांगितले आहे.

केएल राहुल सामना संपल्यावर म्हणाला की, ” गेल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली होती. फलंदाजी करत असताना ३५० धावांचे आव्हान चांगले वाटते. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फटकेबाजी केली. आम्ही त्याच्यावर जो विश्वास ठेवला, तो त्याने सार्थ ठरवला. विराट कोहलीने पुन्हा एकदा शतकासह या सामन्यात समोर आला. विराटची फलंदाजी पाहणे ही एक मेजवानी असते. ऋतुराज आणि विराट यांनी दमदार भागीदारी रचली. ही भागीदारी आम्हाला मोठी धावसंख्या रचण्यासाठी महत्वाची ठरली. ऋतुराजने अर्धशतकानंतर जी धमाकेदार फटकेबाजी केली, ती महत्वाची ठरली जेव्ही ३० षटकांचा खेळ झाला होता, तेव्हा माझी आणि गौतम गंभीर यांची चर्चा झाली, यामधून मी फलंदाजीला बढती घ्यावी असे ठरले. कारण गेल्या सामन्यातही मी अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे मी पाचव्या स्थानावर फलंदाजीला आलो आणि चांगली फलंदाजी करू शकलो. आम्ही गेल्या सामन्यापेक्षा जास्त धावा केल्या खऱ्या, पण यावेळीही आम्ही पराभूत झालो. या गोष्टीचे एक महत्वाचे कारण म्हणजे मैदानात पडलेले दव. दाव पडल्यामुळे चेंडू जड झाला होता आणि ओल्या चेंडूने गोलंदाजी करणे सोपे नव्हते. त्यामुळे ही एक गोष्ट आमच्या पराभवाची कारण ठरली. “

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:47 PM 04/Dec/2025