भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार!

नवी दिल्ली: केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी गेल्या आठवड्यात भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत भेट घेतल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्‍यांनी भारताच्या हवाई क्षेत्रात झेपावण्यासाठी तीन कंपन्या तयार असल्याचं म्हटलंय . नायडू यांनी शंख एअर, एआय हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या तीन कंपन्यांची नावं सांगितली.

शंख एअर या कंपनीला यापूर्वीच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ना हरकत दाखला देण्यात आला आहे. तर, गेल्या आठवड्यात एआय एअर हिंद आणि फ्लायएक्स्प्रेस या कंपन्यांना ना हरकत दाखला देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या धोरणांमुळंजगभरात भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र वेगानं वाढत आहे. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या एअरलाईन्स दाखल होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय प्रोत्साहन देत आहे. उडाण सारख्या योजनेमुळं स्टार एअर, इंडिया वन एअर, फ्लाय 91 या सारख्या छोट्या कंपन्या सुरु झाल्या आहेत आणि त्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असं राम मोहन नायडू यांनी म्हटलं.

इंडिगोचा गोंधळ

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून नव्या एअरलाईन्स कंपन्यांना परवानगी देणंइंडिगोमुळं निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. इंडिगो भारतातील सर्वात मोठी एअरलाईन आहे. केंद्र सरकारच्या फ्लाईटड्युटीटाईमलिमिटेशनच्या मार्गदर्शक सूचना लागू झाल्यानंतर इंडिगोनं त्याची पूर्वतयारी न केल्यानं अनेक प्लाईट रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळंप्रवाशांना मोठा त्रास झाला होता.

इंडिगोनं 95 टक्के नेटवर्क कनेक्टिव्हिटी पूर्ववत केल्याची माहिती दिली आहे. आता इंडिगोच्या 1000 फ्लाईटसुरु आहेत. कंपनी 138 रुट पैकी 135 रुटवर सेवा देत आहे.

इंडिगोच्या गोंधळामुळं ज्यांची तिकिटं रद्द झाली होती, त्या प्रवाशांनारिफंडद्या असे आदेश केंद्र सरकारनं दिले होते. इंडिगोनं त्यानंतर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली होती. इंडिगोच्या गोंधळानंतर कंपनीच्या सीईओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचीकेंद्र सरकारनं चौकशी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 25-12-2025