Ratnagiri : देव-घैसास-कीर महाविद्यालयात विधी साक्षरता कार्यक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने (मुंबई) ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमाअंतर्गत शहरातील देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालययात (१२ जानेवारी) रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा व वाहतूक चिन्हे, गुड समरिटन, आदिवासी समुदायांचे हक्क, विविध सरकारी कल्याणकारी योजना तसेच नालसा योजना २०२५ अंतर्गत मोफत कायदेशीर मदत सेवा या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच सध्या समाजात वाढत असलेल्या ‘ड्रग अॅब्यूज’ (अंमली पदार्थाचे व्यसन) या गंभीर समस्येवरही मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेंद्र पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील होत्या. कार्यक्रमादरम्यान सचिव श्री. पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मिळणाऱ्या मोफत कायदेशीर मदतीचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये तसेच विविध शासकीय योजनांची माहिती, रस्ते सुरक्षा व गुड समरिटन विषयाची माहिती सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 13/Jan/2026