Manuj Jindal | समन्वय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील या निवडणुका सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगांने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन, सतर्क रहावे आणि दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने सर्व समन्वय अधिकाऱ्यांची काल बैठक घेण्यात आली.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षीत यादव, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी रवींद्र बिरादार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, एसएसटी, एफएसटी पथक तयार करा. आचारसंहिता कक्षानी २४,४८ आणि ७२ तासांमधील कार्यवाही करुन अहवाल द्यावा. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावरील नियोजन करून आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर आदेश काढावेत. समन्वय ठेवावा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वांचा सूचनांचा अभ्यास सर्वांनी करावा, असेही ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 16/Jan/2026