Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचे जाणवत असले तरी, सकाळी व रात्रीच्या वेळेत गारवा कायम आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (२१ जानेवारी) रोजी राज्यातील विविध भागांत वेगवेगळ्या स्वरूपाचं हवामान अनुभवायला मिळणार आहे.(Maharashtra Weather Update)
काही जिल्ह्यांत कडाक्याची थंडी जाणवणार असून, तर काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)
राज्यात सध्या उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असून, त्याचा परिणाम विशेषतः अंतर्गत भागांवर अधिक होणार आहे. यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, थंडीचा जोर पुन्हा वाढू शकतो. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा ढगाळ वातावरणही पाहायला मिळू शकते.
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या भागांत सकाळी व रात्री गारवा जाणवणार असून, दिवसा काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते. किनारपट्टी भागांत आर्द्रतेमुळे हवामान दमट वाटण्याची शक्यता असून, तापमानात फार मोठा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरासह परिसरात पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, काही ठिकाणी किमान व कमाल तापमानात किंचित घट नोंदवली जाऊ शकते.
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागांत सकाळी गारवा जाणवणार असून, रात्री थंडीचा प्रभाव वाढू शकतो. शेतकऱ्यांनी पहाटेच्या वेळेत थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठवाडा विभागात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव या भागावर अधिक जाणवणार असल्यामुळे किमान तापमानात घट होईल.
बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळी दाट गारवा आणि रात्री तीव्र थंडी जाणवू शकते. थंडावा काही दिवस कायम राहणार असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.
नागरिकांसाठी सूचना
थंडीचा वाढता प्रभाव लक्षात घेता लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. सकाळी व रात्री उबदार कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
- शेतकऱ्यांनी पिकांवर थंडीचा परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- कडाक्याच्या थंडीमुळे हरभरा, गहू, कांदा, भाजीपाला पिकांवर परिणाम होऊ शकतो. पहाटेची दव व थंडी लक्षात घेता हलके सिंचन करून जमिनीतील तापमान नियंत्रित ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 21-01-2026














