गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे मालवणातील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा अहवाल सादर

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा(Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने 16 पानी अहवाल, राज्य सरकारकडे सादर केला आहे.

गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं या अहवालात नमुद करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना, त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार केली नसल्याचंही अहवालात उल्लेख आहे.

भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. दरम्यान हा अहवाल आल्यानंतर, राज्य सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

वेल्डिंगमधे अनेक ठिकाणी चुका होत्या, समितीचा अहवाल

मालवण छत्रपती शिवाजी महाराज दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे मुख्य कारण यामध्ये समोर आले आहे. तसेच देखभाल योग्य पद्धतीने झाल्यानेच पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता, असे म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता, चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग या पुतळ्याचा करण्यात आलं होतं.

महाराजांचा पुतळा का कोसळला?

शिवाजी महाराजांचा ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार करण्यात आली नसल्याचं अहवालात तज्ज्ञांनी म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला असून यातील प्रमुख कारण आता समोर येत आहे. पुतळा पडण्याची अनेक कारण या तज्ञ मंडळींनी नमूद केली आहेत मात्र त्यातील प्रामुख्याने काही कारणे समोर आली आहेत.

चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई होणार : उदय सामंत

मंत्री उदय सामंतानी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल योग्य पद्धतीनं केली नाही त्यामुळे पुतळ्याला आतून गंज चढला होता. तसेच डिझाईनमधे अनेक चुका होत्या. वेल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी चुका होत्या. चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 26-09-2024