राजापूर : राजापूर शहरातील चिंचबाध येथे उरुस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली परवानगी राजापूर पोलिसानी नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजाराम चव्हाण यानी दिली आहे.
राजापूर शहरातील मच्छीमार्केट चिंचबाध येथे उरुस साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात असणारा मनाई आदेश पाहता सदर ठिकाणी जमाव करुन उरुस साजरा करता येणार नाही असे स्पष्ट करत राजापूर पोलिसानी सदर उरुसाला परवानगी नाकारली आहे. तशी माहिती राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजाराम चव्हाण यानी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 20/Feb/2025
