बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडत ‘वर्षा ‘ वर सरेंडर होतील : रवी राणा

अमरावती : बच्चू कडुंनी नवनीत राणांना पाडायची सुपारी घेतली होती, या शब्दांत हल्लाबोल आमदार रवि राणा यांनी केलायं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार म्हणून रवि राणा यांचे अमरावतीत बॅनर झळकत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने राणा यांच्याकडूनअमरावतीत जोरदार तयारी सुरु आहे. राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी बच्चू कडू यांचं थेट नाव घेत हल्लाबोल चढवलायं.

रवि राणा म्हणाले, बच्चू कडे हे महायुतीतच होते, शिंदे गटातील आमदारांसोबत ते गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी अचलपूरच्या जनतेला विचारुन गेले नव्हते. गुवाहाटीत खोक्याचं बिल झालं ते जनतेला विचारुन झालं नव्हतं. महायुतीत असताना त्यांनी मंत्रिपद भोगलंय, आजही त्यांना कॅबिनेटचा दर्जा आहे. महायुतीत असताना मंत्रिपद घेणे, खोक्याचं राजकारण करणे, भ्रष्टाचार करणे, तडजोडी करणे हे महायुतीत होते तेव्हा चालत होतं, असा मोठा गौप्यस्फोट राणा यांनी केलायं.

तसेच लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात डमी उमेदवार केला होता. या निवडणुकीदरम्यान, कडू आणि इतरांमध्ये देणं घेणं झालंय, हे संर्वांना माहिती आहे. बच्चू कडूंनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाडायची सुपारी घेतली होती. त्यामुळे राणा यांना कोणीपाडलं हे मला वेगळं सांगण्याची गरज नसल्याचं रवि राणा यांनी स्पष्ट केलंय.आम्ही पूर्ण ताकदीने काम करताना भाजपच्या कमळाच्या उमेदवाराला विरोध करणारा बच्चू कडू असून त्यांनी डमी उमेदवार उभा करुन त्यांनी नवनीत राणांना पाडलं, आता पुढील काळाच अचलपूरची जनता बच्चू कडूला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराही रवि राणा यांनी बच्चू कडू यांना दिलायं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 19-10-2024