सरन्यायाधीशांवरील हल्ला निषेधार्ह : अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे प्रस्ताव मांडून या घटनेचा निषेध केला आहे. न्या. गवई यांनी दाखवलेल्या शांतता व संयमाने न्यायाविषयी निष्ठा आणि कटिबद्धता सिद्ध करते, असे सांगून बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी हा हल्ला निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.

रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे अॅड. राकेश किशोर यांच्याशी संबंधित दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यांनी भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण आर. गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अॅड किशोर यांचे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे. सुसंस्कृत आणि व्यावसायिक कायदेशीर वातावरणात अपेक्षित असलेल्या प्रतिष्ठेचे, शिष्टाचाराचे आणि गांभीर्याचे घोर उल्लंघन करत आहे.

रत्नागिरी बार असोसिएशनचे सदस्य या निंदनीय कृत्याबद्दल स्पष्ट नापसंती आणि खोलवर खेद व्यक्त करत आहेत. असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे प्रस्तावात म्हटले आहे. या निषेधाच्या ठरावाला अॅड. अशोक कदम यांनी अनुमोदन दिले आहे. या निषेध सभेला अॅड. फजल डिंगणकर, अॅड. प्रदीप नेने, अॅड. अनिरुद्ध फणसेकर, अॅड. प्रफुल्ल साळवी, अॅड. अवधूत कळंबटे, अॅड. प्रिया लोवलेकर उपस्थित होते. न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अशाप्रकारचे हल्ले होणार नाहीत, यासाठी कठोर कायदा करण्याची मागणीही केली आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 10/Oct/2025