Ratnagiri Customs Department : ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत सीमा शुल्क विभागाकडून स्वच्छता मोहीम

रत्नागिरी : सीमा शुल्क विभाग, रत्नागिरी मंडळाने भारत सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा भाग म्हणून दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुरुगवाडा जेटीजवळील मरीन फ्लोटिंग जेटी आणि व्हाईट सी नजीक स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले. रत्नागिरी सीमा शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी या मोहिमेत उत्साहाने भाग घेतला, किनारपट्टीच्या भागांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. या अभियानादरम्यान, प्रामुख्याने जेटीचा परिसर, विशेषतः ब्रेकवॉटर क्षेत्र आणि सीमा शुल्क गस्ती जहाजे उभी केली जातात, तो भाग स्वच्छ करण्यात आला.

आजूबाजूला पडलेला कचरा (मुख्यतः प्लास्टिकजन्य पदार्थ) मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात आला. सहभागींमध्ये प्लास्टिक कचरा कमी करणे आणि सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याबद्दल जागरूकता देखील वाढवण्यात आली. मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेल्या अनेक कचऱ्याच्या पिशव्या रत्नागिरी महानगरपालिकेने पाठवलेल्या कचरा संकलन वाहनाद्वारे उचलण्यात आल्या. ‘प्लास्टिक मुक्त भारत’ या सरकारच्या संकल्पनेनुसार, सहभागींना कार्यक्रमादरम्यान प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पुनर्वापर करता येणाऱ्या बाटल्या, कप आणि ताट वापरण्यास प्रोत्साहन देण्यात आले. सीमा शुल्क विभाग, रत्नागिरी यापुढेही अशा उपक्रमांद्वारे ‘स्वच्छ भारत मिशन’ ला पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असून, स्वच्छ, हरित आणि अधिक शाश्वत राष्ट्रासाठी योगदान देत राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 30/Oct/2025