रत्नागिरी : भारतीय टपाल विभागतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पधेचे विषय तुमच्या मित्राला / मैत्रिणीला डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचा आहेत याबद्दल पत्र लिहा. ज्या मुलांचे वय ५ मे २०२६ रोजी १५ वर्षे पेक्षा जास्त नाही अशी मुले स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. पत्र लेखन मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतच करावे. लिहण्यात येणारा संदेश पत्राच्या स्वरुपात असावा व शब्द संख्या ८०० पेक्षा जास्त नसावी. अर्जावरील वय शाळेच्या अधिका-यांनी प्रमाणित केलेले असावे. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी आहे.
ही स्पर्धा ८ मार्च रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत होईल. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना सर्कल स्तरावर प्रथम बक्षिस २५ हजार रुपये, द्वितीय बक्षीस १० हजार रुपये, तृतीय बक्षीस ५ हजार रुपये व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. पहिल्या तीन क्रमांकाना राष्ट्रीय स्तरावर प्रथम बक्षीस ५० हजार रुपये, द्वितीय बक्षीस २५ हजार रुपये, तृतीय बक्षीस १० हजार रुपये व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. तसेच स्पर्धेचे ठिकाण प्रत्येक शाळेला कळविण्यात येईल. सर्कल स्तरावरील ३ बक्षीसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार आहेत आणि त्यानंतर येथे पुन्हा नंबर काढण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 04/Feb/2026














