रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला थाटात प्रारंभ

रत्नागिरी : शारदीय नवरात्रोत्सवाला Navratri गुरुवारपासून थाटात प्रारंभ झाला आहे. मंदिरांमधील पारंपरिक घटस्थापनेबरोबरच जिल्ह्यात ठिकाठिकाणी देवीच्या मूर्तींची वाजत गाजत आगमन मिरवणूक काढून नंतर प्रतिष्ठापना करण्यात आली.

रत्नागिरीत रत्नदुर्ग किल्ल्यावरची श्री भगवती देवी, आडिवऱ्याची महाकाली, दाभोळची चंडिकादेवी, चिपळूणची विंध्यवासिनी, तुरंबव येथील शारदादेवी अशा पुरातन मंदिरांसह जिल्ह्यातल्या देवीच्या अन्य मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत असून, दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४८७ ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामध्ये ४२५ सार्वजनिक नवरात्रोत्सवांचा समावेश आहे. अनेक घरांमध्येही घटस्थापना करून नऊ दिवस देवीचे मनोभावे पूजन केले जाते. पूर्वीच्या तुलनेत जिल्ह्यात अलीकडच्या काळात सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि गरबा, दांडिया कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार ६२ ठिकाणी प्रतिमा पूजन, ३६ हजार ६२९ ठिकाणी घरगुती, तर १७४ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 04-10-2024