रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी येथे नेपाळी खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १० मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

दुखराम भागी राजी (४३, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. दुखराम राजी याला दारूचे व्यसन होते. शनिवारी सायंकाळी मिरकरवाडा जेटी येथील सफवान अल हमिदा या बोटीच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात तो बुडालेल्या अवस्थेत तेथील नागरिकांना दिसून आला.

याबाबत तातडीने शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 12/May/2025