रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील गुरववाडी येथे मनाई आदेशाचे उल्लंघन करत जमाव करुन एकमेकांना मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मे रोजी रात्री ८ वा. सुमारास घडली आहे. दिनेश अनिल गुरव (२०) आणि अनुराग अरविंद गुरव (दोन्ही रा. राजापूर गुरववाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महिला पोलिस नाईक ममता नामये यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, दोन्ही संशयितांनी राजापूर जकात नाका दत्तभेळ सेंटर समोर ८ मे रोजी लागू केलेल्या महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वयेच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन तसेच जमाव करुन एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १९४(२) महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 13/May/2025
