मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. त्याला शनिवारी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घडामोडींवरती ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
गुणरत्न सदावर्ते प्रतिक्रिया देताना म्हणाले, सबकुछ फिल्मी हैं, स्वत: प्रोडक्शन काढणे आणि महेश मांजरेकरांना डायरेक्टर करणे, हे सगळं फुल टू फिल्मी आहे. हा ड्रामा सिरिअस सुद्धा मी म्हणणार नाही. दोन्ही राजकीय पक्षांचे काय अस्तित्व आहे. राज ठाकरेंची लोकं विधानसभा आणि लोकसभेत आहे का? एक दोन इव्हेंट ते घेतात. उद्धव ठाकरे मामूजान, भाईजान करतात, किती त्यांना समजलं आणि किती न्याय हक्कासाठी ते उभं राहातात सर्वांना माहिती आहे. वक्फमुळे लोकांना त्रास होतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही किरकोळ, काय होलसेल दुकान उघडणार आहे का? कोणता ब्रॅंड? चिन्ह टिकू शकतं का? किती मतं आहेत?
हिंदुत्वापासून दूर गेलेत असंही पुढे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे.
राज-उध्दव ठाकरेंच्या एकत्रित येण्यावरती एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं आणि कामाचं बोल असं म्हटलं होतं, त्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया बोलकी आहे, कामाचं बोल. यांच्यावर टाइम घालवणं चुकीचं आहे. हे करमणूक करणारे आहेत. बॅंक आंदोलन माघार घ्यावं लागलं, हिंदी भाषा सक्तीविरोधात बोलले. तालिबानी देश नाही आहे. राज ठाकरेंनी स्वत: बोलले 2008 साली हिंदी राजभाषा आहे. एका पत्रकाराने त्यांना नोट्स दिले होते, नोट्सवर बोलणारे राज ठाकरे आहे. एका मताने हिंदी ही राजभाषा मान्यच झाली आहे. राज ठाकरेंचे हे आंदोलन फेल जाणार, अशात नवीन प्रोडक्ट महेश मांजरेकर यांना आणून मार्केटमध्ये चालेल का?? म्हणून आणलं असल्याचंही सदावर्ते पुढे म्हणालेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सोयाबीन आणि शेतीवर बोलून दाखवावं, लोकांना गोष्टी समजल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना पाॅलिटिकल सायकाॅलाॅजिस्टची गरज आहे. हे राजकीय वेडेपण आहे, काय करु, काय करु, कसं करु, कसं करु यांचं सुरु आहे. हे दोघेही राजकीय अनफिट आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
संदीप देशपांडेंवरती बोलताना सदावर्ते म्हणाले?
संदीप देशपांडे यांनी काही पत्र व्यवहार केला असेल तर ते त्यांना अधिकार आहेत. संदीप चिंतनीय माणूस आहेत. तो राईट पर्सन आॅन रॉंग प्लेस आहे, मंत्री होण्याची क्षमता असलेला माणूस आहे. राज ठाकरेंना जे सुचलं नाही, ते संदीप देशपांडेंना सुचलं असंही पुढे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 21-04-2025
