रत्नागिरी : जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत जलसंपदा विभागाने प्रलंबित असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावावीत. साफसफाई, स्वच्छ सुंदर कार्यालय, जलपुर्भरण याची कार्यवाही स्वतःपासून सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यावेळी म्हणाले, “१०० दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हाधिकारी परिसरातील तीनही इमारतीमधील कार्यालयांना भेट द्यावी. त्याप्रमाणे स्वच्छ सुंदर माझे कार्यालय अंतर्गत आपल्या विभागाची सर्व कार्यालयांची साफसफाई करावी. ही साफसफाई दररोज होते का हे पहाणे आवश्यक आहे. माहिती अधिकाऱ्यासह अन्य तक्रारींचे निरसन शुन्य संख्येत व्हायला हवे, त्याचबरोबर कालवा सफाईसारखे स्वतःहून काही कार्यक्रम घ्यावेत, प्रत्येकांनी जबाबदारीने कामे करावीत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन यावर कार्यक्रम करावा. पाणी वापर संस्था सक्षमीकरण यावर कार्यशाळा घ्यावी. शेतकरी पाणी वापर संस्था यांचा संवाद होतोय का त्यावरही भर द्यावा.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 21/Apr/2025














