'बावनदी ते वाकेड' महामार्गावर होणार ५० हजार वृक्षांची लागवड

Aug 5, 2024 - 11:52
Aug 5, 2024 - 15:01
 0
'बावनदी ते वाकेड'  महामार्गावर  होणार ५० हजार वृक्षांची लागवड

लांजा : मुंबई-गोवा महामर्गावरील बावनदी ते लांजा तालुक्यातील वाकेड या टप्प्यात सुमारे ५० हजार वृक्षांची लागवड महामार्गाच्या इथपर्यत होणार आहे, ३ कोटी २२ लाख रूपये या वृक्ष लागवडीवर खर्च होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाचे हिरवेगार रूप बहरणार आहे.

चौपदरीकरणाच्या कामात बावनदी ते वाकेड या दरम्यान २३ हजार झाडे तोडण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने वृक्षप्रेमींच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग हरित महामार्ग होईल असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. 

या महामार्गावर पुन्हा नव्याने देशी वाणाची वृक्ष लावण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई गोवा महामार्गांचे उपअभियंता अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, बावनदी ते वाकेड ठीकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा देशी वाणाची सुमारे ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत, या अगोदर चौपदीकरणाच्या कामात २३ हजार झाडे तुटले आहेत. वन विभागाचे सहकार्य घेऊन पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी कोकणातल्या मातीत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, निम ताम्हण, कदंब, कांचन, आवळा, अर्जुन, आपटा, महोगनी, पिंपळ, पांढरा शेवगा, जांभूळसारख्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. वन विभागाच्या रोपवाटिकेतून एक वर्षापेक्षा जास्त वय असणारी झाडे आणण्यात आली आहेत.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मीटरमध्ये छोटी, मध्यम आाणि मोठी अशी तीन स्वरुपाची झाडे लावली जातील, चौपदरीकरणासाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या तिप्पट झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यामध्ये स्थानिक हवामानात वाढतील आणि प्राणवायू सोडणाऱ्या झाडांची निवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीचे तंत्र निश्चित केले आहे. रस्ताच्या दुतर्फा गटार सोडून एक मीटरपासून वृक्ष लागवडीस सुरुवात होईल. सात मीटर अंतरावर झाडे लावण्यात येतील पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या टप्प्यात उंच वाढणारी झाडे असतील, चढत्या क्रमाने झाडे लावली तर ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाहीं व पर्यावरणावर होणारे परिणाम टाळता येतील. झाडे मिळविण्यासाठी कंत्राटदाराने जवळाच्या नर्सरीधारक किवा वन विभागाची मदत घ्यावयाची आहे. प्रति किलोमीटरला ५३८ झाडे लावण्यात येणार आहेत. त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्चित केले आहे. लागवड झाडांची देखभाल १५ वर्ष संबंधित ठेकेदाराला करावी लागणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow