रत्नागिरी : स्वच्छता कर्मचारी तटपुंज्या मानधनावर

Aug 7, 2024 - 12:00
 0
रत्नागिरी  : स्वच्छता कर्मचारी तटपुंज्या मानधनावर

रत्नागिरी  : गेल्या २० वर्षांपासून स्वच्छतेची काळजी घेणारे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील राज्यातील १ हजार २०० कर्मचारी चाळीशी पार करूनही तटपुंज्या मानधनावर अस्थिर काम करत आहेत. तुटपुंज्या वेतनावर उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने राज्य शासनाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी शासनाकडे ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेने राज्यध्यक्ष ऋषिकेश शिलवंत यांनी केली आहे.

शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद खंडपिठात एक याचिका दाखल केली होती. खंडपिठाचे न्यायमूर्ती घुगे यांनी कंत्राटी कर्मचारी हे राज्य शासनाचेच कर्मचारी असल्याचा निर्वाळा दिला, असे या निवेदनात नमूद केले आहे. या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट) कोर्टात दाद मागण्याचा अधिकार असल्याने सदर प्रकरण औरंगाबाद मॅट कोर्टाकडे वर्ग करण्यात आले. २० मार्चला याचा निकाल लागला.

ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये १० वर्ष पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना घेऊन ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेने शासनाकडे कायम करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचा निकाल दिला आहे. ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री तसेच पाणीपुरवठा विभागाच्या मंत्र्यांकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून शासकीय नियमानुसार वेतन अदा करावे व होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी या पत्रातून केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow