रत्नागिरी : गावडेआंबरेत देवीच्या पागेची होडी सोडून मच्छीमारीला सुरुवात करण्याची परंपरा

Sep 9, 2024 - 15:00
Sep 9, 2024 - 15:10
 0
रत्नागिरी : गावडेआंबरेत  देवीच्या पागेची होडी सोडून मच्छीमारीला सुरुवात करण्याची परंपरा

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबरे गावातील खारवी समाजामध्ये गेली अनेक वर्षे देवीचा पाग टाकल्याशिवाय मच्छीमारी केली जात नाही ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. ही परंपरा गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला केली जाते. गावडेआंबेरे गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने जाकादेवी मंदिरामध्ये देवीला कौल प्रसाद करून देवीचे मानकरी ठरविण्यात आले. त्यानंतर देवीच्या पागेची होडी सोडण्यात आली. गणेशोत्सवानंतर येथील मच्छीमारीला सुरुवात होणार आहे.

यावर्षी हरेश आंबेरकर हे देवीचे मानकरी ठरले असून, त्यांच्यासोबत त्यांची बहीण संकल्या आंबेरकर यांना मान मिळाला आहे. या समाजातर्फे आता गणपतीनंतर खऱ्या अर्थाने  मच्छीमारीला सुरुवात होणार आहे. खारवों समाजातील ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. माशांच्या प्रजननासाठी जूनमध्ये मच्छीमारी व्यवसायावर ती बंदी घालण्यात येते.

तीन महिने कायम असते. रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबरे येथील खारवी समाज  हा श्रीदेवी जाकादेवीला मानतो. ही देवी खारी समाजाच्या मच्छीमारी जाळीमध्ये सापडली होती. त्यामुळे तिच्या हुकमाशिवाय हा समाज मच्छीमारीसाठी जात नाही. गावडे आंबरे येथील श्री आई जाकादेवी या मंदिरामध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देवीचे रूप देवीची पाग व देवीची होडी ठरवण्यासाठी देवीकडे मच्छीमारीसाठी कौल मागण्यात आला. यावर्षी देवीचे मानकरी हरेश आंबेरकर व त्याची  बहीण संकल्पा आंबेरकर ठरले आहेत. 

देवीच्या पागेची होडी करून ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये समुद्रामध्ये सोडण्यात आली.  त्यानंतर त्यात मिळालेल्या माशांची माळ तयार करून देवीच्या मानकर यांच्या बहिणीच्या गळ्यात  घालण्यात आल्यानंतर ढोल ताशांच्या  गजरात मिरवणूक काढण्यात आली व प्रसादाने या कार्यक्रमाची सांगाता झाली अशा तन्हेने आता खारवी समाज मच्छीमारीला सुरुवात करणार आहे.


अनेक वर्ष आमच्या खारवी समाजामध्ये देवीची पाग झाल्याशिवाय मच्छीमारी व्यवसायाला सुरवात केली जात नाही. मच्छीमार बांधव कोणाच्याही बोटीवर मच्छीमारीला  जात नाहीत. त्यामुळे देवीची पाग झाल्यानंतर तिच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे मच्छीमारीला जातात. ही परंपरा वर्षानुवर्षे पाळली जात आहे. नतीन पिढीही त्याचे अनुकरण करत आहेत. एवढी श्रद्धा देवीवर आहे. तिच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे व्यवसाय करून बांधव सुखरूपपणे घराकडे परतत असतात. लक्ष्मण सारंग, सरपंच, गावडे-आंबेरे 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:25 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow