रत्नागिरीत फूल विक्रीतून लाखोंची उलाढाल

Sep 13, 2024 - 11:10
 0
रत्नागिरीत फूल विक्रीतून लाखोंची उलाढाल

रत्नागिरी : कोकणात प्रत्येक घरात गणपतीची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते. त्यासाठी झेंडू, लिली, शेवंती, अष्टर या फुलांच्या हारांना मोठी मागणी असते. गेल्या आठवडाभरात दररोज रत्नागिरी शहरातील फुलवाल्यांकडून दिवसाला सात ते आठ टन झेंडूची फूले, हार विक्रीमधून सुमारे दहा लाखांची उलाढाल झाली. यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडील फुलांचा टक्का कमीच आहे; मात्र पश्चिम महाराष्ट्रातून ८० टक्के फूले आणली जातात. गणेशोत्सवाची धामधूम अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु राहते. गौरी-गणपती विसर्जनादिवशी बहुसंख्य घरगुती गणपतींना निरोप दिला जातो. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणरायाची पुजा, सजावटीसाठी फूलांना प्रचंड मागणी असते. त्यात दुर्वांसह झेंडू, लिली, शेवंता यांच्या फुलांचा हार वापरला जातो. अनेक ठिकाणी जास्वंदाची फुले मिळत नसल्याने बहुसंख्य घरांमध्ये झेंडूचे हार गळ्यात घालण्यासाठी वापरतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow