मुंबई- गोवा महामार्गाची डेडलाईन हुकण्याची शक्यता

खेड : राज्यातील लोकसभा निडणुकीपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत २०२४ पर्यंत पुर्ण होईल व महामार्गाचे काम हे युध्दपातळीवर सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्षाच्या नेते मंडळीनीं आपल्या भाषणशैलीतुन जनतेला दिली होती. माञ सध्या सुरू असेले महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असुन या संदर्भमार्गावरील अनेक पुलांची कामे अध्याप अपूर्णच आहेत या महामार्गवरील कामे पूर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता दिसुन येत आहे. त्यामुळे डिसेंबर २०२४ ही डेडलाईन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंतचे काम पुर्ण झाले आहे: माञ नागेठणे, कोलाड, पुई, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अर्धवट आहे. पळस्पे ते इंदापुर हा तब्बल ८४ किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता. याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानतंर पळस्पे ते कासू पर्यंत काम होत आले आहे. माञ त्या नतंर काम पुर्ण ठप्प झाले आहे. माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामादरम्यान १०० वॉर्डन्स लावण्यासदंर्भात राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे. त्याच्या पुढच्या रसत्याचे काम हे एल एन टीकडे असुन बहुतांश काम पुर्ण झाले आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम हे २०१० पासुन संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जनआक्रोष समितीने माणगाव येथेआमरणऊपोषण केले होते याची दख्खल प्रशासनानी घेतली होती, तसेत माणगाव येथे प्रशासकिय होती, तसेत माणगाव येथे प्रशासकिय कार्यालयाला पञ देऊन दिंडीही काढण्यात आली होती. विषेश बाब म्हणजे स्वता बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तब्बल ५ वेळा पहाणी दौराही केला होता त्याच बरोबर कोकणकरांना दिलासा देण्यासाठी निवडणुकी पूर्वी स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माणगाव पर्यंत पहाणी केली होती. जनआक्रोष या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत असुन मिळतात फक्त खोट्या डेडलाईन ने अस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असुन पुढिल नियोजना बाबत सद्या जनआक्रोषची चर्चा सुरू आहे.

या बाबत जनआक्रोष कडुन वारंवार सांगण्यात येत आहे कि रोज आपघात होत आहेत परंतु अपघातग्रस्तांना शासनाची कुठलिही मदत त्या परिवाराला मिळत नाही. दळवणालाही मोठा फटका बसत आहे. सुरुवातीला मुबंई गोवा महामार्ग हा ‘बिओटी तत्वावर बांधला जाणार होता; मात्र प्रधानमंत्री नरेद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानतंर या महामार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन दिला आहे परंतु दोन चार ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यानी अनेकदा खंत व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 14/Dec/2024