रत्नागिरी : मुंबईतील घाटकोपर जॉली जिमखाना आयोजित दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या मिताली पाठकला पराभूत केले.
राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील महिलांच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने २५-१९, १२-२१, २५-१३ असा तीन सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात मुंबईच्या मिताली पाठकला पराभवाचा धक्का दिला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या महिलांच्या लढतीत मुंबईच्या रिंकी कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-५, १५-२२, २५-५ असे पराभूत केले.
महिलांच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी पाठकने मुंबई उपनगरच्या नारायणकरला २१-१४, १६-१७, २१-२० असे तर आकांक्षाने मुंबईच्या रिंकी कुमारीवर २४-१४, २५-१४ अशी मात केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना जिमखान्याचे मानद सचिव मुकेश बदानी व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरूण केदार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण, घाटकोपर जॉली जिमखान्याचे खजिनदार बलवंत संगरका व मिकीन सेठ, ट्रस्टी मारिश गांधी व नीलकंठ सेठ, स्पोर्ट्स समन्वयक प्रशांत कार्या व स्पर्धा समन्वयक नलिन मेहता उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 15-01-2025
