Heat wave alert: राज्यात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा 'यलो' अलर्ट; तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता
मुंबई : राज्यात नागरिक उष्णतेच्या झळांनी हैराण झाले असून काल राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज राज्यातील ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:55 27-05-2024
What's Your Reaction?